अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी रवाना

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना झाली. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज पहाटे भगवती नगर इथं यात्रेकरूंना हिरवा झेंडा दाखवला. या तीर्थयात्रेसाठी एकूण ५ हजार ८९२ यात्रेकरू रवाना झाले आहेत. २ हजार ४८७ यात्रेकरु बालताल मार्गाने तर ३ हजार ४०३ यात्रेकरु पहलगाम मार्गाने अमरनाथला पोहोचतील. यात्रेचा समारोप ९ ऑगस्टला श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. सरकारनं पुरवलेल्या सुविधा आणि सुरक्षेबद्दल यात्रेकरुंनी समाधान व्यक्त केलं आहे.