August 7, 2024 8:30 PM | Cricket | INDvsSL

printer

तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतापुढं विजयासाठी २४९ धावांचं आव्हान

श्रीलंकेत कोलंबो इथं सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात, श्रीलंकेनं भारतापुढं विजयासाठी २४९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं निर्धारित ५० षटकात ७ गडी गमावून २४८ धावा केल्या. अविष्का फर्नांडोचं शतक थोडक्यात हुकलं त्यानं ९६ धावा केल्या. कुशल मेंडिस ५९, तर पथुम निशंकानं ४५ धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे रियान परागनं ३ गडी बाद केले.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.