भारतीय महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी, हरिका द्रोणवल्ली, आर. वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी FIDE जागतिक करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
त्यामुळं भारत या स्पर्धेच्या अंतिम आठ टप्प्यात चार खेळाडू असलेला पहिला देश बनला आहे. पहिल्या आठमध्ये चार भारतीय खेळाडू असल्यानं, आता भारत आणि चीन यांच्यात विजेतेपदासाठी चुरस आहे.