निवडणूक आयोगावर काँग्रेसची टीका

निवडणूक याद्या, दुबार मतदार आणि प्रभाग रचनेविषयी विरोधी पक्षांनी हरकती नोंदवल्या होत्या, मात्र निवडणूक आयोगाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पुण्यातला सत्ताधारी पक्षाचा एक कार्यकर्ता प्रभाग रचना करत असल्याचं उघड होऊनही आयोगानं कारवाई केली नाही, असं सांगत महानगरपालिका निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष होणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.