ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था घोटाळाप्रकरणी ईडीची कारवाई

ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था घोटाळाप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ८५ कोटी ८८ लाख रुपये किंमतीच्या स्थावर मालमत्तांवर टाच आणली. मुंबई, पुणे औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या निवासी सदनिका, व्यावसायिक कार्यालयांच्या जागा, आणि भूखंडाचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत याप्रकरणी ९५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तांवर जप्ती किंवा टाच आणली आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.