भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आदरांजली

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यासह देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे.

(राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. संसद भवनात आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह संसद सदस्यांनी बाबासाहेबांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. 

बाबासाहेबांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व न्याय, समता आणि संविधानाच्या तत्वांवरची त्यांची निष्ठा भारताच्या वाटचालीत महत्त्वाची ठरली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. 

राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर मान्यवरांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. 

इंदू मिलच्या जागेवर सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम पुढल्या वर्षी सहा डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. आंबेडकर यांनी उभारलेला संघर्ष हा मानवमुक्तीचा, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा होता, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. देशभरातून आंबेडकरी अनुयायी मुंबईत चैत्यभूमीवर दाखल होत असून पहाटेपासूनच अभिवादनासाठी मोठी रांग लागली आहे.)

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.