मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात अनुकंपा तत्वावरील गट क आणि गट ड मधल्या तसंच राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीद्वारे निवड झालेल्या एकूण दहा हजारांपेक्षा जास्त उमेदवारांना नियुक्तीपत्रं वितरीत करण्यात आली.
प्रशासनाचं बळकटीकरण करायला सरकारचं प्राधान्य आहे, संस्थात्मकदृष्ट्या प्रशासनाला बळकट केलं तरच प्रशासन गतीशील, संवेदनशील आणि लोकाभिमुख होऊ शकतं, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या दृष्टीनं अनुकंपा तत्वावरील शासन निर्णयात सुधारणा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अनुकंपा तत्वावरल्या ८० टक्के जागा भरल्या असून उरलेल्या जागा काही दिवसात भरल्या जातील असंही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, गडचिरोली मधे आयोजित कार्यक्रमात सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांच्या हस्ते अनुकंपा आणि सरळसेवा पदभरतीच्या २१० उमेदवारांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली.