देशातील साखर हंगाम संपला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात 18 टक्क्यांनी अर्थात 58 लाख टनांनी घट झाली आहे. यंदा 257 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्यावर्षी हेच उत्पादन 315 लाख टन इतके झाले होते. सरासरी साखर उताऱ्यातही शून्य पूर्णांक 80 टक्क्यांनी घट होऊन यंदा केवळ 9 पूर्णांक 30 टक्के साखर उतारा मिळाला आहे. यंदा उत्तरप्रदेशाने महाराष्ट्राला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावत 92 लाख 80 हजार टन उत्पादन घेतले.
महाराष्ट्रात 80 लाख 95 हजार टन उत्पादन झाले आहे. ऊसाची घटलेली उपलब्धता आणि साखर उताऱ्यातील घट यामुळे प्रत्यक्ष साखर उत्पादन कमी झाल्याची माहिती राष्ट्रीय साखर महासंघाने दिली आहे.मात्र देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा असून येत्या हंगामात अनुकूल पावसाळी परिस्थिती तसच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात वाढलेल्या ऊस लागणीमुळे साखर उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा असल्याचं महासंघानं म्हटलं आहे.