डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत ५० कोटी ७५ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांची पेरणी

देशात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत ५० कोटी ७५ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ६२ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कडधान्य, एक कोटी ४० लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबिया, तर एक कोटी १५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात लावणी झाली आहे. या तिन्ही प्रकारांमधल्या पिकांच्या पेरणीचं क्षेत्रं गेल्यावर्षीपेक्षा वाढलं आहे.