महिला क्रिकेटमधे, तिरंगी एकदिवसीय मालिकेत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं भारतावर ३ गडी राखून विजय मिळवला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारतानं निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून २७५ धावा केल्या. रिचा घोषनं सर्वाधिक ५८ धावा केल्या. श्रीलंकेतर्फे सुगंधिका कुमारी आणि चामरी अटापट्टू यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
श्रीलंकेनं ७ गड्यांच्या मोबदल्यात, सामन्यातले ५ चेंडू बाकी असताना विजयी लक्ष्य पार करत २७८ धावा केल्या. निलाक्षीका सिल्वानं ३३ चेंडूत ५६ धावा केल्या. तर हर्षिता समरविक्रमानं ५३ धावांचं योगदान दिलं. भारतातर्फे स्नेहा राणानं ३ बळी घेतले.