डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली दीक्षाभूमीला भेट

महाराष्ट्र याआधी न्याय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ओळखलं जात असे. मात्र महायुतीचं सरकार आल्यावर इतली प्रशासन व्यवस्था कोलमडली अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न असून महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीपथावर आणण्यासाठी ही निवडणूक आहे, असंही खर्गे म्हणाले.

 

महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर महालक्ष्मी योजना, कृषी समृद्धी योजना, आरोग्य विमा, मोफत प्रवास अशा लोककल्याणकारी योजना राबवू असं आश्वासन यावेळी खर्गे यांनी दिलं. काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यांमध्ये शेतमालाला हमीभाव दिला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
त्याआधी मल्लिकार्जुन खरगे यांनी नागपूरमध्ये दीक्षाभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला तसंच गौतम बुद्ध यांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं खर्गे यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. खर्गे आज दुपारी अमरावती इथं तर संध्याकाळी सव्वा सात वाजता नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रचारसभेला संबोधित करणार आहेत.