November 17, 2024 7:11 PM | Congress | Maharashtra

printer

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या, लॉरेन्स बिश्नोई टोळीनं बॉलिवुड अभिनेत्यांना दिलेल्या धमक्या इत्यादी प्रकरणांकडे त्यांनी लक्ष वेधलं आणि या सगळ्याला महायुतीच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप त्यांनी केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.