आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही बातमीपत्रांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार दुपारी ३ चं प्रादेशिक बातमीपत्र ३ वाजून २० मिनिटांनी, संध्याकाळी पाच वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र ५ वाजून २० मिनिटांनी तर रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ८ वाजून २० मिनिटांनी प्रसारित होईल.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागाचा कार्यक्रम वृत्तविशेष आणि अर्थविशेष संध्याकाळी सव्वासात ऐवजी रात्री साडेआठ वाजता प्रसारित होईल. पुढील आदेश येईपर्यंत हे बदल कायम राहतील.