July 7, 2024 3:14 PM
19
राज्यात योजनांची अतिवृष्टी असून अंमलबजावणीचा दुष्काळ – उद्धव ठाकरे
राज्यात योजनांची अतिवृष्टी असून अंमलबजावणीचा दुष्काळ आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते. सरकारनं शेतकऱ्याला हमीभाव आणि कर्जमाफी दिली नाही, आरक्षणावर तोडगा काढला नाही, अशी टीका त्यांनी केली.