प्रादेशिक बातम्या

July 22, 2024 7:37 PM July 22, 2024 7:37 PM

views 9

रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट

राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, तर ठिकठिकाणी नदी नाल्यांचे प्रवाह फुगले आहेत.  राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीएवढा पाऊस पडला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये यंदा सर्वाधिक पाऊस पडला असून, १२ जिल्ह्यांमध्ये सरा...

July 21, 2024 8:09 PM July 21, 2024 8:09 PM

views 15

मुंबई मराठी पत्रकार संघात २३ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण

२३ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल मुंबई मराठी पत्रकार संघात झाला. ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचे प्रथम पारितोषिक दीपावली या अंकाला, द्वितीय पारितोषिक ऋतुरंग आ...

July 21, 2024 7:55 PM July 21, 2024 7:55 PM

views 8

पुण्यात आणखी ४ रुग्णांना झिका विषाणूची लागण

पुण्यात आणखी ४ रुग्णांना झिका विषाणूची लागण झाल्याचं निदान झाल्यानं रुग्णांची एकूण संख्या आता ३२ वर पोहोचली आहे. हे रुग्ण पुण्याच्या येरवडा, वडगाव बुद्रुक, प्रभात मार्ग आणि विधी महाविद्यालय मार्ग या परिसरातले आहेत. यापैकी २३ रुग्णांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार सुरु आहेत तर ४ जणांना रुग्णालयात दाखल क...

July 21, 2024 7:35 PM July 21, 2024 7:35 PM

views 8

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल – गृहमंत्री अमित शहा

  महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात भाजपाच्या महाअधिवेशनाच्या समारोप सत्रात बोलत होते.   केंद्राकडून महाराष्ट्राला भरघोस निधी मिळाला, युती सरकारच्या काळात बरीच विकासकामं झाली, अनेक मोठे...

July 21, 2024 6:43 PM July 21, 2024 6:43 PM

views 12

आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातल्या याचिकांवर २३ जुलैला सुनावणी

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या फुटीनंतर,आमदार अपात्रेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर येत्या मंगळवारी म्हणजेच २३ जुलैला सुनावणी होणार आहे. यासंदर्भात झालेल्या मागच्या सुनाव...

July 21, 2024 2:56 PM July 21, 2024 2:56 PM

views 7

वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदातल्या सिद्धांतांचा अभ्यास करून या क्षेत्रात संशोधन करावं – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव

वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदातल्या सिद्धांतांचा अभ्यास करून या क्षेत्रात संशोधन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल वर्धा इथं केलं. वर्ध्याच्या दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाच्या १५व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. या समारंभात वैद्यकीय, दंतविज्ञान,...

July 21, 2024 7:52 PM July 21, 2024 7:52 PM

views 12

राज्याच्या विविध भागात आज पावसाचा जोर

राज्याच्या विविध भागात पावसानं आज जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून त्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत. मुंबई आणि उपनगरांत आज मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. धेरी पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा अंधेरी सब वे, तसंच दादरच्या ह...

July 21, 2024 6:50 PM July 21, 2024 6:50 PM

views 9

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या महाअधिवेशनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.   लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांनी संविधान, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबा...

July 20, 2024 8:33 PM July 20, 2024 8:33 PM

views 15

नागपूरच्या १३७ गावांमध्ये बीएसएनएलची 4-जी सेवा उपलब्ध

महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातल्या १३७ गावांमध्ये जेथे कुठलीही मोबाईल सेवा नव्हती तेथे बीएसएनएलची 4 -जी सेवा आता उपलब्ध होत आहे. देशात 4-जी स्तरावरची मोबाईल सेवा असली पाहिजे या उद्देशाने देशातल्या १ लाख गावांपैकी ज्या ३४ हजार गावात कोणतीही सेवा नव्हती त्याठिकाणी बीएसएनएलच्या 4 जी सेक्युरेशन प्रोज...

July 20, 2024 8:11 PM July 20, 2024 8:11 PM

views 6

मोदी सरकारच्या निर्णयामुळे कृषी आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट झालं – राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

सहकार क्षेत्रासाठी नवीन मंत्रालय स्थापन करून केंद्रातील मोदी सरकारनं गेल्या १० वर्षात घेतलेल्या निर्णयांमुळे कृषी आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट होत असल्याचं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात सांगितलं. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या वार्षिक पदवीदान समारंभात प...