प्रादेशिक बातम्या

August 24, 2024 8:46 AM

views 35

अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये – हवामान खात्याचा इशारा

अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे आज मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात डहाणूसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. दरम्यान नारळी पौर्णिमेनंतर समुद्रातील मच्छीमारीला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली असताना वादळ सदृश्य वात...

August 23, 2024 7:25 PM

views 34

रत्नागिरीतल्या ३११ गावांचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात समावेश

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राबद्द्लची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमधल्या ३११ गावांचा समावेश आहे. या अहवालानुसार चिपळूणमधल्या ४४, खेडमधल्या ८५, खेडमधल्या २५, लांजा तालुक्यातल्या ५०, राजापूरमधल्या ५१ आणि संग...

August 23, 2024 7:22 PM

views 35

मुंबईत राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचं केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईत राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचं उद्घाटन आज केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते झालं. राज्याचे कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संस्थेने काही सामंजस्य करारही केले.  राष्ट्रीय कौशल्य प...

August 24, 2024 10:15 AM

views 28

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला उच्च न्यायालयाकडून मनाई

महाराष्ट्रात, बदलापूर इथं लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती; मात्र यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं काल एका सुनावणी याचिकेवर मनाई केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणी न्यायाल...

August 23, 2024 7:03 PM

views 25

बंदबाबत न्यायालयाच्या  निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री

बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या पुकारलेला राज्यव्यापी बंद मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवला आहे. यासंदर्भात न्यायालयाच्या  निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नाशिकमध्ये बातमीदाराशी बोलताना त्यांनी सांगितलं, की बदलापूरची घटना...

August 23, 2024 6:56 PM

views 23

लाडकी बहीण योजनेसह सुरक्षित बहीण योजनाही राबवण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी लाडकी बहिण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहिण योजनाही राबवली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. ते नाशिकमधे  महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत आयोजित महिला महाशिबीरात बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही लाडकी बहीण योजना चालू राहील, तसंच ऑगस्ट ...

August 23, 2024 7:56 PM

views 41

भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पुढे नेण्यात मुंबईची भूमिका मोठी – केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल

भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पुढे नेण्यात मुंबईची भूमिका मोठी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय बंदरं, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत केलं. मुंबई बंदर प्राधिकरणाचे विविध प्रकल्पांचं उद्घाटन सोनोवाल यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे प्रकल्प आणि सामंजस्य करार मुं...

August 23, 2024 6:50 PM

views 32

महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाची मनाई

बदलापूर इथल्या लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीला उद्या महाराष्ट्र बंद करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पीठासमो...

August 23, 2024 6:08 PM

views 28

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत राज्यभरातल्या जागांबाबत अद्याप चर्चा सुरू – नाना पटोले

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत राज्यभरातल्या जागांबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितलं. विधानसभा निवडणुकीसंदर्भात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे राज्यातले प्रमुख नेते नाशिकमध्ये आले असता वार्ताहर परीषदेत पटोले यांनी ही...

August 23, 2024 3:48 PM

views 34

महाविकास आघाडीनं पुकारलेला बंद हे विकृतीविरोधातलं आंदोलन – उद्धव ठाकरे

बदलापूरमध्ये दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं उद्या पुकारलेला बंद हे विकृतीविरोधातलं आंदोलन असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळणार असून ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.