प्रादेशिक बातम्या

November 18, 2024 7:32 PM November 18, 2024 7:32 PM

views 7

महायुती सरकारच्या काळात महागाई आणि बेरोजगारीत प्रचंड वाढ-मल्लिकार्जुन खर्गे

महायुती सरकारच्या काळात शेतकरी, कामगार, तरुण, महिला यांचं जगणं कठीण झालं आहे, महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, अशी टीका करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाविकास आघाडीला विजयी करण्याचं आवाहन केलं. ते वसई इथं प्रचारसभेत बोलत होते. भाजपा समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत असून काँग्रे...

November 18, 2024 7:29 PM November 18, 2024 7:29 PM

views 22

जगात भारत पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला – जे. पी. नड्डा

जगात भारत पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन इतकी बनवायची असेल तर महायुतीला मतदान करावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज नवी मुंबईत केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.

November 18, 2024 7:24 PM November 18, 2024 7:24 PM

views 14

महाविकास आघाडीनं अनेक विकासकामांमध्ये अडथळे आणल्यामुळे लाखो रोजगारांवर गदा- मुख्यमंत्री

महाविकास आघाडीनं अनेक विकासकामांमध्ये अडथळे आणल्यामुळे लाखो रोजगारांवर गदा आली असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केला. मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. वाढवण बंदर, जैतापूर, बारसू रिफायनरी अशा अनेक प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. कोविड काळातही महाविकास आघाडीने भ्रष्टाचार केल्याचा ...

November 18, 2024 7:23 PM November 18, 2024 7:23 PM

views 9

सबका साथ, सबका विकास हेच आपलं ध्येय – नितीन गडकरी

आपल्या सरकारने नागपूरचा सर्वांगिण विकास करण्यासाठी केला असून सबका साथ, सबका विकास हेच आपलं ध्येय आहे, असं प्रतिपादन भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नागपूर इथं आयोजित सांगता सभेत ते बोलत होते.  काँग्रेसकडे साठ वर्षे सत्ता असूनही नागपूरचा विकास झाल...

November 18, 2024 7:05 PM November 18, 2024 7:05 PM

views 11

महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यात घोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप

महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नगरविकास खात्यात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. मुंबईत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. मुंबई शहरात मेट्रोचं काम अद्याप अपूर्ण आहे. मेट्रोमार्गासाठी बसवलेल्या खांबांवर अनेक ठिकाणी अद्...

November 18, 2024 6:58 PM November 18, 2024 6:58 PM

views 8

राज्यात आता प्रचारसभा, मिरवणुका आयोजित करता येणार नाही-निवडणूक अधिकारी कार्यालय

राज्यात आता प्रचारसभा, मिरवणुका आयोजित करता येणार नाही. आयोजित केल्या तर आयोजक आणि सहभागी होणारे अशा दोघांवर गुन्हे दाखल होतील. यात दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.  या कालावधीत जाहिराती करतानाही नियमांचं पा...

November 18, 2024 7:09 PM November 18, 2024 7:09 PM

views 10

संविधान बदलणं हा भाजपाचा हेतू – शरद पवार

संविधान बदलणं हा भाजपाचा हेतू असून, संविधानाला धक्का लागला तर नागरिकांचे मूलभूत अधिकार धोक्यात येतील, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज बारामती इथं विधानसभा निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत बोलत होते.    आपल्या सत्ताकाळात आपण कारखाने, एमआयडीसी उभारून हजारो रोजगार निर्माण केले. मात्र म...

November 18, 2024 3:23 PM November 18, 2024 3:23 PM

views 3

नागपूरमध्ये ४,३०० पोलीस कर्मचाऱ्यांचं मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान केलं

राज्यात येत्या २० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर राहणार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष मतदानाची सोय करण्यात आली आहे. नागपूरमध्ये तैनात ४ हजार ३०० पोलीस कर्मचाऱ्यांनी मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान सुरू केलं आहे.  विविध पोलीस ठाण्यांतील कर्मचारी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावत...

November 18, 2024 1:23 PM November 18, 2024 1:23 PM

views 5

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आज प्रचारासाठी राज्याच्या दौऱ्यावर असून ते बेलापूर, सोलापूर  आणि अहिल्यानगर इथं प्रचारसभा घेतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज दुपारी नागपूर आणि नंतर वर्धा इथं जाहीर सभा घेतील. सांगली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उम...

November 18, 2024 1:20 PM November 18, 2024 1:20 PM

views 12

महायुतीमुळे ७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

राज्यातल्या ५ लाख युवांना रोजगार देण्याची क्षमता असलेले ७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सत्ताधारी महायुतीमुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोजगार, महागाई, महिलांचे प्रश्न यासह महाराष्ट्...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.