प्रादेशिक बातम्या

January 8, 2026 3:45 PM January 8, 2026 3:45 PM

views 9

उल्हासनगरातली गुंडशाही मोडून शहराचा चेहरा बदलण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

उल्हासनगरातली गुंडशाही मोडून शहराचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. तसंच, उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींच्या निधीची घोषणाही त्यांनी केली.   एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातल्या विविध विकासकामांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्...

January 8, 2026 3:15 PM January 8, 2026 3:15 PM

views 35

अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश

अंबरनाथ नगरपालिकेतल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित १२ नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत त्यांचा नवी मुंबईत हा कार्यक्रम झाला.    भाजपासोबत युती केल्यानं काँग्रेसनं काल त्यांचं निलंबन केलं होतं. पक्षाने आम्हाला विश्वासात न घे...

January 8, 2026 3:03 PM January 8, 2026 3:03 PM

views 64

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं निधन

ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं काल रात्री पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. भारताच्या पर्यावरण विषयक संशोधन आणि संवर्धन धोरणाला आकार देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. आपल्या सहा दशकांपेक्षा जास्त वैज्ञानिक कारकिर्दीत, पर्यावरणाबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासा...

January 8, 2026 2:40 PM January 8, 2026 2:40 PM

views 14

थांबा! प्रक्रीया केलेले अन्नपदार्थ किंवा शीतपेयांचं सेवन केल्यानं होतोय ‘कॅन्सर’

प्रक्रीया केलेले अन्नपदार्थ किंवा शीतपेयांचं सेवन केल्यानं कर्करोगाचा धोका वाढतो असा संशोधन अहवाल ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. potassium sorbate, potassium metabisulfite, sodium nitrite, potassium nitrate, acetic acid यासारख्या अन्नपदार्थांना दीर्घकाळ टिकवून ठेवणाऱ्या रसायनांमुळं कर्...

January 8, 2026 1:40 PM January 8, 2026 1:40 PM

views 12

प्रसिद्ध साहित्यिक ज्ञानरंजन यांचं मध्यप्रदेशात जबलपूरमध्ये निधन

प्रसिद्ध साहित्यिक ज्ञानरंजन यांचं काल मध्यप्रदेशामधल्या जबलपूर इथं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. काल सकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.    महाराष्ट्रातल्या अकोला इथं २१ नोव्हेंबर १९३६ ला ज्ञानरंजन यांच...

January 6, 2026 7:16 PM January 6, 2026 7:16 PM

views 38

बिनविरोध उमेदवार निवडून येणं म्हणजे मतदारांचा अधिकार हिरावून घेणं – सुप्रिया सुळे

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ७-८ वर्षांनंतर होत असूनही मोठ्या प्रमाणावर बिनविरोध उमेदवार निवडून येणं म्हणजे मतदारांचा अधिकार हिरावून घेणं आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलं. यात धमक्या देणं, पैशांचा वापर, उमेदवारी अर्...

January 6, 2026 7:20 PM January 6, 2026 7:20 PM

views 54

मुंबई आणि नागपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज ‘मिशन मुंबई’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात मुंबई महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या मराठी शाळा सुरू करणं, शाळांमध्ये योग्य व्यवस्था उपलब्ध करणं, बेस्ट बसेस वाढवणं, मुंबईकरांना चांगली आरोग्य व्यवस्था, स्वच्छ पाणी आणि हवा देणं यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे...

January 6, 2026 7:21 PM January 6, 2026 7:21 PM

views 47

‘यूटीएस ॲप’ १ मार्चपासून पूर्णपणे बंद?

मुंबई उपनगरीय गाड्या आणि अनारक्षित तिकिटांसाठी वापरलं जाणारं 'यूटीएस ॲप' येत्या १ मार्च पासून पूर्णपणे बंद होणार असल्याचा दावा खोटा असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. यूटीएस ॲपवरून फक्त नवीन मासिक पास काढण्याची सुविधा बंद केली आहे, मात्र ॲपवर काढलेले जुने पास त्यांचा कालावधी संपेपर्यंत वैध राहती...

January 6, 2026 7:21 PM January 6, 2026 7:21 PM

views 14

मुंबई सराफा बाजारात चांदी महागली!

मुंबईच्या सराफा बाजारात चांदी आज ६ हजार रुपयांनी महाग होऊन किलोमागे अडीच लाख रुपयांच्या पलीकडे गेली. इंडियन बुलियन आणि ज्वेलरी असोसिएशनच्या दरांनुसार चांदी दिवसअखेर करांसह २ लाख ५० हजार ४४४ रुपयांच्या पलीकडे बंद झाली. गेल्या आठवड्यात चांदीनं अडीच लाखांच्या पातळीला स्पर्श केला होता, पण नंतर त्यात घसर...

January 6, 2026 6:18 PM January 6, 2026 6:18 PM

views 18

कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

ऑनलाइन परकीय चलन आणि सोन्याचा व्यवहार करणाऱ्या योजनांमध्ये शेकडो लोकांची २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. विविध राज्यांमधल्या ५० पेक्षा जास्त प्रकरणांशी संबंधित सात जणांना अटक केल्याची माहिती मीरा भाईंदर-वसई विरारचे पोलिस...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.