प्रादेशिक बातम्या

November 22, 2025 8:11 PM November 22, 2025 8:11 PM

views 9

वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. विशेष भाडे आकारून चालवण्यात येणारी, बांद्रा टर्मिनस-पालीताना सुपरफास्ट स्पेशल, ही गाडी उद्या संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी वांद्रे स्थानकातून रवाना होईल आणि दु...

November 22, 2025 7:27 PM November 22, 2025 7:27 PM

views 7

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचं आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं भवितव्य बदलू शकतं – मंत्री नितीन गडकरी

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीचं आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं भवितव्य बदलू शकतं, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसंच ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केलं. 'संत्रा: स्पेन, इस्रायल व्हाया विदर्भ' या पुस्तकाचं प्रकाशन आज गडकरी यांच्या हस्ते ...

November 22, 2025 7:20 PM November 22, 2025 7:20 PM

views 11

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या ८०० एकर जागेचं पर्यावरणीय पुनरूज्जीवन लवकरच होणार

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या ८०० एकर जागेचं पर्यावरणीय पुनरूज्जीवन वन विभाग लवकरच करणार असून या प्रकल्पाला झिरोधा कंपनी आणि रेनमॅटर फाऊंडेशन आर्थक सहाय्य करणार आहेत. जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचं पुनरूज्जीवर य...

November 22, 2025 7:16 PM November 22, 2025 7:16 PM

views 11

शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ हेल्पलाईन सुरू करणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती

शालेय मुलामुलींसाठी राज्य परिवहन महामंडळ लवकरच हेल्पलाईन सुरू करत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला आज भेट दिल्यानंतर ते बोलत होते. शाळा आणि घर या दरम्यान बस प्रवासात काही अडचण आल्यास, बस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना योग्...

November 22, 2025 7:13 PM November 22, 2025 7:13 PM

views 13

धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ रस्ते अपघातात ४ जणांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यातल्या अणदूर जवळ आज सकाळी एका वाहन अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे. धावत्या क्रूझर गाडीचे टायर फुटल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. हे सर्व जण सोलापूर जवळच्या कासेगाव-उळे इथून निघाले होते.

November 22, 2025 7:00 PM November 22, 2025 7:00 PM

views 11

पालघर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काल अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून उमेदवार आणि पक्षांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ ...

November 22, 2025 6:10 PM November 22, 2025 6:10 PM

views 5

जगभरातल्या भाषांमधलं नोबेलप्राप्त साहित्य मराठीत अनुवादित करण्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं-ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस

'मराठी साहित्य संमेलनांवर खर्च करण्यापेक्षा जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधलं दर्जेदार, तसंच नोबेलप्राप्त साहित्य लगेच मराठीत अनुवादित करण्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केली. मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती...

November 22, 2025 6:04 PM November 22, 2025 6:04 PM

views 8

२०२९ पर्यंत काँग्रेस पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये प्रचंड विसंगती असल्यानं हा पक्ष देशातून हद्दपार होत आहे. २०२९ पर्यंत या पक्षाचं अस्तित्व फार शिल्लक राहणार नाही, असं  मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज व्यक्त केलं. गडचिरोली इथं भाजपच्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं.त्यानंतर झालेल्या...

November 22, 2025 5:51 PM November 22, 2025 5:51 PM

views 5

हज यात्रेशी निगडित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या भारतीय हज समितीला सूचना

हज यात्रेशी निगडित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्यक सचिव चंद्र शेखर कुमार यांनी भारतीय हज समितीला दिल्या आहेत. मुंबईत झालेल्या हज परिषदेत ते बोलत होते. हज यात्रेसाठी अर्ज करण्यापासून यात्रेहून परत आल्यानंतर करायच्या प्रक्रिया सुद्धा डिजिटल करण्याची ...

November 22, 2025 3:54 PM November 22, 2025 3:54 PM

views 24

राष्ट्रीय छात्र सेना-NCC ची क्षमता १७ लाखांवरून २० लाखापर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार

राष्ट्रीय छात्र सेना-NCC ची क्षमता १७ लाखांवरून २० लाखापर्यंत वाढवण्याचा आणि राष्ट्रीय विकास तसंच राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात विविध कार्यक्रमांत एनसीसीचा सहभाग वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. सुरक्षा सचिव राजेश कुमार सिंह यांनी ७८ व्या राष्ट्रीय छात्र सेना दिनानिमित्तानं नवी दिल्लीत राष्ट्रीय समर स्मारक...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.