राष्ट्रीय

August 4, 2024 2:56 PM

views 32

सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत, याकरता राज्यपालांनी पुढाकार घ्यावा – राष्ट्रपती

राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचा काल राष्ट्रपती भवनात समारोप झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकमेकांच्या अनुभवातून शिकण्याच्या भावनेनं सर्वसमावेशक चर्चा करण्याच्या राज्यपालांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. सरकारी योजनांचे फायदे तळागाळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचावेत, विशेषतः अनुसूचित जाती- जमाती...

August 4, 2024 2:53 PM

views 25

कृषी अर्थतज्ज्ञांच्या ३२व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत परदेशी प्रतिनिधींकडून भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषीक्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा

नवी दिल्ली इथं आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या ३२व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित असलेल्या परदेशी प्रतिनिधींनी भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषीक्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा केली आहे. या सहा दिवसीय परिषदेला ७५ देशांमधले कृषी अर्थतज्ञ उपस्थित असून त्यांनी  भारताच्या कृषिक्षेत्रातल्या कामगिरीचं...

August 4, 2024 1:50 PM

views 21

अवयव प्रत्यारोपणासाठी मानवी अवयव हवाई मार्ग, रेल्वेमार्ग किंवा रस्त्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासंदर्भात केंद्रसरकारने जारी केली कार्यपद्धती

अवयव प्रत्यारोपणासाठी मानवी अवयव हवाई मार्ग, रेल्वेमार्ग किंवा रस्त्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठीची कार्यपद्धती केंद्रीय अर्थमंत्रालयानं जारी केली आहे. मानवी अवयवांचा पूर्ण उपयोग करून घेणं आणि त्यांची गरज असलेल्या रुग्णांसाठी हे अवयव उपलब्ध करून देणं हा या कार्यपद्धतीचा उद्देश असल्याच...

August 4, 2024 7:51 PM

views 46

झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३०८ वर

वायनाड इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३०८ इतकी झाली आहे. अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. सैन्य दल, भारतीय तटरक्षक दल, वायू सेना यांच्या मदतीने अद्यापही बचावकार्य सुरू असून पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मातीच्या ढिगाऱ्यात अद्यापही काही मृतदेह असण्याची शक्यता वर्तवण्...

August 4, 2024 1:45 PM

views 25

देशात विविध ठिकाणी पावसाचा प्रकोप

हिमाचल प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या ३७ दिवसांत ढग फुटी, पूर आणि भूस्खनाच्या एकूण ४७ घटना घडल्या आहेत. राज्यात २२ ठिकाणी अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. १७ ठिकाणी भूस्खलनाच्या घटना तर ८ ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांत १० जणांचा मृत्यू,...

August 4, 2024 10:09 AM

views 24

देशातील अन्नधान्य विविधता जगासाठी आशेचा किरण असल्याचा पंतप्रधानांचा विश्वास, बत्तिसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचा नवी दिल्लीत आरंभ

भारतात मुबलक अन्नधान्य उपलब्ध असून, जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या 32 व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्...

August 4, 2024 10:00 AM

views 42

आसाममधील मोरीगाव इथं 27 हजार कोटी रुपयें गुंतवणुकीनं सेमीकंडक्टरचा कारखाना

आसाममधील मोरीगाव इथं टाटाच्या सेमीकंडक्टर युनिटचे बांधकाम सुरू झालं आहे असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत याबद्दल अधिक माहिती देताना वैष्णव म्हणाले की, या एककामध्ये 27 हजार कोटी रुपयें गुंतवणूक केली जाईल आणि 15 हजार प्रत्यक्ष आणि 11 त...

August 4, 2024 9:58 AM

views 12

पश्चिम घाट क्षेत्राअंतर्गत येत असलेला महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील परिसर ‘पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यासाठी नवीन मसुदा अधिसूचना

पश्चिम घाट क्षेत्राअंतर्गत येत असलेला महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील 56800 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त परिसर ‘पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारनं नवीन मसुदा अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू या सहा राज्यांचा यात समावेश आ...

August 3, 2024 8:12 PM

views 9

जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचे प्रतिपादन

जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं ३२व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्या वेळी ते बोलत होते. सरकार कृषी क्षेत्रात विविध सुधा...

August 3, 2024 8:11 PM

views 24

देशवासियांनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहाने भाग घ्यावा, असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन

देशवासियांनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहाने भाग घ्यावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. येत्या ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरांवर तिरंगा फडकावून अभिमानाने स्वातंत्र्यदिन साजरा करावा असं त्यांनी आज समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधे म्हटलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून एक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.