राष्ट्रीय

October 12, 2025 11:56 AM

views 27

दिल्ली हाफ मॅराथॉन स्पर्धेत ४० हजार ५०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि भारतीयस्पर्धक सहभागी

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी काही वेळापूर्वी दिल्ली हाफ मॅराथॉनला हिरवा झेंडा दाखवत प्रारंभ केला आहे. आशियातल्या या प्रमुख स्पर्धेत ४० हजार ५०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय आणि भारतीयस्पर्धक सहभागी होत आहे. यंदाच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये तिन्ही संरक्षण दल सहभागी होत आहेत...

October 12, 2025 10:49 AM

views 43

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात ६ माओवाद्यांना अटक

छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शुक्रवारी सहा माओवाद्यांना अटक केली आणि मंगनार रस्त्याजवळ लावलेली स्फोटकं निकामी कऱण्यात यश मिळवले. संशयास्पद व्यक्तींबाबत मिळालेल्या माहितीनंतर बारसूर पोलिस स्टेशन, जिल्हा राखीव रक्षक, केंद्रीय राखीव पोलिस दल यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली.

October 12, 2025 10:09 AM

views 45

शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी युपीआयचा वापर करण्याचं शिक्षण मंत्रालयाचं शाळांना आवाहन

शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी युपीआयचा वापर करण्याचं शिक्षण मंत्रालयाचं शाळांना आवाहन शाळा प्रवेश आणि परीक्षा शुल्क गोळा करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळांनी युपीआयचा वापर करण्याचं आवाहन शिक्षण मंत्रालयानं शाळांना केलं आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेश तसंच एनसीइआरटी, सीबीएससी...

October 12, 2025 9:57 AM

views 47

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिए गोर यांची दिल्लीत भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिए गोर यांची भेट घेतली. गोर यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका यांच्यातील व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक भक्कम होईल असा विश्वास प्रधानमत्र्यांनी समाज माध्यमांवरील संदेशात व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि गो...

October 12, 2025 9:26 AM

views 60

पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना आणि डाळींमध्ये आत्मनिर्भरता मोहीम देशातील लाखो शेतकऱ्यांचं भविष्य बदलतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह ४२ हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ काल पंतप्रधानांच्या ह...

October 11, 2025 7:12 PM

views 34

अन्नधान्य निर्मितीत भारताला आत्मनिर्भर करुन, निर्यातीचं लक्ष्य ठेवण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

अन्नधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करणं तसंच जागतिक बाजारासाठी उत्पादन करणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह ४२ हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ आज प्रधानमंत्र्यांच...

October 11, 2025 1:41 PM

views 22

शेतकऱ्यांच्या मनातही स्वदेशीला प्राधान्य ही संकल्पना रुजत असल्याचं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. कृषी उपकरणांवर जीएसटी कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असं कृषीमंत्री म्हणाले. रब्बी पिकांच्या हमीभावात सरकारने वाढ केली, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत ३ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस...

October 11, 2025 1:40 PM

views 40

दिवाळी आणि छट पूजेनिमित्त विक्रमी संख्येनं जादा गाड्या उपलब्ध होणार

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला भेट देत नव्याने सुरु झालेल्या यात्री सुविधा केंद्राची पाहणी केली. या केंद्रामुळे रेल्वे स्थानक परिसरातली गर्दी कमी होऊन प्रवासही सुकर व्हायला मदत होईल असं ते म्हणाले. इथं पुरवलेल्या सुविधा आणखी ७६ रेल्वे स्थानकांवरही उपलब्ध करण्यात ये...

October 10, 2025 3:13 PM

views 52

नीती आयोगाचा कर धोरणावरच्या अहवालाचा दुसरा भाग प्रकाशित

नीती आयोगानं कर धोरणावरच्या अहवालाचा दुसरा भाग ‘भारतातील करांमधील बदल : गुन्हेगारीकरणाला आळा घालणे आणि विश्वासाधारित प्रशासन ’ आज नवीदिल्लीत प्रकाशित केला. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी हा अहवाल प्रकाशित केला. सर्व प्रकारचे दिवाणी पर्याय संपुष्टात आल्यानंतर कोणत्या प...

October 10, 2025 2:58 PM

views 281

२०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरीना मच्याडो यांना जाहीर

२०२५चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरीना मच्याडो यांना जाहीर झाला आहे. व्हेनेझुएलामध्ये नागरिकांच्या लोकशाही हक्कांचं रक्षण आणि हुकुमशाहीपासून लोकशाहीकडे देशाची वाटचाल शांततेत व्हावी, यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिल्याची घोषणा नॉर्वेच्या नोबेल समितीनं केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.