मिश्र

October 28, 2025 2:52 PM

views 99

मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात अतिदक्षतेचा इशारा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं 'मोंथा' चक्रीवादळ  आज अधिक तीव्र झालं असून ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगानं ते आज मध्यरात्रीच्या सुमारास आंध्रप्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यात मछलीपट्टण ते कलिंगपट्टणच्या दरम्यान थडकण्याची शक्यता आहे.  श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टणम, अनकापल्ली, पूर्व गोदावरी, कोनासीम...

October 24, 2025 8:19 PM

views 49

आंध्रप्रदेशात बस अपघातात २० जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमध्ये कुर्नुल इथे आज पहाटे खाजगी प्रवासी बसला लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू झाला. हैदराबादहून बंगळुरूला जाणारी ही खाजगी बस दुचाकीला धडकल्यानंतर तिनं पेट घेतला. बसचा दरवाजा उघडता न आल्यानं प्रवाशी बाहेर पडू शकले नाहीत.बसमध्ये ४१ प्रवासी होते, त्यातल्या २१ जणांना वाचवण्यात यश आलं असून त्...

October 24, 2025 2:42 PM

views 95

जाहिरात क्षेत्रातले दिग्गज पियुष पांडे यांचं निधन

आधुनिक भारतीय जाहिरात क्षेत्राचे शिल्पकार पियुष पांडे यांचं मुंबईत आज सकाळी निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. गेले काही दिवस ते विषाणू संसर्गाने आजारी होते.    ऑगिल्व्ही या जाहिरात कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष असलेले पांडे यांना २०१६ साली पद्मश्री ने सन्मानित करण्यात आलं होत.    भारतीय जनता पक्...

October 15, 2025 8:03 PM

views 48

ज्येष्ठ तेलगु अभिनेत्री-गायिका रावु बालसरस्वती देवी यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आणि तेलुगु चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या पार्श्वगायिका रावु बालसरस्वती देवी यांचं हैदराबाद इथं निधन झालं त्या ९७ वर्षांच्या होत्या. बालकलाकार म्हणून त्यांनी काम सुरु केलं. १९४३ मधे भाग्यलक्ष्मी या चित्रपटात अभिनेत्री कमला कोटणीस यांच्यासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. अभिनेत्...

October 15, 2025 1:33 PM

views 67

राजस्थानमध्ये झालेल्या बस अपघातात मृतांची संख्या २०

राजस्थानमध्ये जैसलमेरजवळ काल एका वातानुकूलित बसला आग लागून झालेल्या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला तर १५ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी अनेकजण ७० टक्क्यांपर्यंत गंभीर भाजले आहेत.   शॉर्ट सर्किटमुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली असून जखमींना उपचारासाठी जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्ण...

October 13, 2025 7:18 PM

views 101

नैऋत्य मौसमी पावसाची राज्यातून पूर्णपणे माघार

नैऋत्य मौसमी पावसानं राज्यातून पूर्णपणे माघार घेतली असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय. राज्यातला मान्सूनचा माघारीचा प्रवास आज पूर्ण झाला. आता केवळ दक्षिण भारत आणि ओडिशातून मान्सूनची माघार शिल्लक आहे.    येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागान...

October 13, 2025 8:11 PM

views 189

२०२५साठीचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर

२०२५साठीचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार जुएल मोकीर, फिलिप आगियों आणि पीटर हॉविट यांना जाहीर झाला आहे. तंत्रज्ञान किंवा नवोन्मेषामुळं कशारितीनं आर्थिक प्रगती होऊ शकते याबद्दल मोकीर यांनी संशोधन केलं. त्यांना या पुरस्कारातली अर्धी रक्कम दिली जाईल. उर्वरित अर्धी रक्कम इतर दोघांमध्ये वाटली जाईल. नव...

October 13, 2025 1:36 PM

views 40

करुर चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयतर्फे करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकीय नेता विजय यांच्या करूर इथल्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले.    तामिळनाडूत करूर इथं गेल्या २७ सप्टेंबरला विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम- TVK पक्षाच्या  जाहीर सभेच्या ठिकाणी  झालेल...

October 12, 2025 6:35 PM

views 45

घर खरेदीच्या प्रमाणात २८ टक्के घट

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत घर खरेदीच्या प्रमाणात २८ टक्के घट झाल्याचं रिअल इस्टेट डेव्हलपर सिग्नेचर ग्लोबल इंडिया या संस्थेने आपल्या अहवालात नोंदवलं आहे. घर खरेदीसाठी या काळात २० अब्ज १० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून ही उलाढाल गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीपेक्षा २८ टक्के कमी आहे, असं य...

October 10, 2025 2:58 PM

views 304

२०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरीना मच्याडो यांना जाहीर

२०२५चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरीना मच्याडो यांना जाहीर झाला आहे. व्हेनेझुएलामध्ये नागरिकांच्या लोकशाही हक्कांचं रक्षण आणि हुकुमशाहीपासून लोकशाहीकडे देशाची वाटचाल शांततेत व्हावी, यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिल्याची घोषणा नॉर्वेच्या नोबेल समितीनं केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.