डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जातनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, म्हणून सरकारनं जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून तेलंगणा आणि कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. जातनिहाय जनगणनेमुळे प्रत्येक समाज घटकाची लोकसंख्या समजेल, पाटीदार, गुर्जर, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात यामुळे मदत होईल. महाराष्ट्रात ओबीसींची संख्या २७ वरून वाढून ६४ टक्क्यापर्यंत जाऊ शकते, असं ते म्हणाले. 

 

कर्नल सोफिया यांच्याबद्दल अयोग्य भाषा मध्य प्रदेशातले मंत्री विजय शाह यांनी वापरली, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, तसंच त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा