डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जातनिहाय जनगणनेच्या अंमलबजावणीविषयी काँग्रेसच्या विविध सूचना

जातनिहाय जनगणनेविषयी सर्व राजकीय पक्षांबरोबर संवाद साधावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. प्रधानमंत्र्यांना त्यांनी तसं पत्र लिहीलं असून त्यात तेलंगण सरकारनं राबवलेल्या जातनिहाय जनगणनेचं प्रारूप केंद्रसरकारनं  पाहावं अशी सूचना केली आहे. आरक्षणावरची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, खासगी शिक्षण संस्थांमधे अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गियांसाठी आरक्षण ठेवावं असे अनेक मुद्दे खरगे यांनी सुचवले आहेत.

 

दरम्यान, खरगे यांच्या पत्रावर भाजपानं टीका केली आहे. जातनिहाय जनगणनेचा निर्णय सरकारने काँग्रेसकडून घेतल्यामुळे त्याचं श्रेय मिळवण्यासाठीची ही धडपड असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते गुरुप्रकाश यांनी केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा