कॅनडामधल्या टोरंटोमध्ये रथ यात्रेदरम्यान झालेल्या विघातक कृत्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या कृत्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करण्याची विनंती भारतानं कॅनडाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
या रथ यात्रेत झालेल्या विघातक कृत्यांच्या अहवालांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माध्यमांना दिली. हे कृत्य दुर्दैवी असून, ऐक्य आणि सामाजिक सुसंवाद वाढवण्यासाठी आयोजित केलेल्या उत्सवाच्या विरोधी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.