अचूक आणि दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी प्रसारकांवर आहे – एल.मुरुगन

अचूक आणि दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी प्रसारकांवर आहे,असं प्रतिपादन माहिती प्रसारण राज्यमंत्री एल.मुरुगन यांनी आज केलं.नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडियन मोबाइल काँग्रेसमध्ये बदलते कल आणि तंत्रज्ञान या विषयावर ते बोलत होते. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

केंद्र सरकारनं नुकतंच २३४ शहरातल्या ७३० नव्या खासगी रेडिओ केंद्रांना परवानगी दिल्याची माहिती त्यांनी दिली. प्रसारण क्षेत्रातली नियामकीय भूमिका बदलण्याची आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या पुढे राहण्याची गरज माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी व्यक्त केली. भविष्यातल्या प्रसारण क्षेत्रासाठीची तंत्रज्ञान आणि नियामकांची भूमिका यावर दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी भूमिका मांडली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.