डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ब्राम्होस एकात्मिकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचं संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेली कारवाई म्हणजे भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं तसंच आणि लष्करी सामर्थ्य आणि निर्धारचं प्रतिक आहे असं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लखनऊ इथल्या ब्राम्होस एकात्मिकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते.

 

हा प्रकल्प म्हणजे भारतानं संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल आहे आणि यामुळे भारताची ताकद वाढेल असं ते म्हणाले. ब्रह्मोस हे केवळ शस्त्र नाही तर ते, शत्रूला भारतीय सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचा इशारा देणारं आणि सीमांचं रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचा संदेश आहे असं त्यांनी सांगितलं.

 

या सुविधा केंद्रासोबतच खाजगी सार्वजनिक क्षेत्राच्या भागिदारीअंतर्गत लखनऊमध्ये पीटीसी इंडस्ट्रीज लिमिटेडद्वारे टायटॅनियम आणि सुपर-अलॉय धातू निर्मिती प्रकल्प सुरु केला जात असल्याचं, तसंच आणखी ७ महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणीही केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा