डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी हक्कभंगाची नोटीस बजावली

आभारप्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपाच्या बांसुरी स्वराज यांनी आज हक्कभंगाची नोटीस बजावली. राहुल गांधी यांनी सभागृहात सांगितलेल्या काही गोष्टी चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असून त्याकरता त्यांच्यावर कारवाई करावी असं स्वराज यांनी या नोटिशीत म्हटलं आहे.

दरम्यान आपल्या भाषणातले अनेक अंश गाळल्याचा निषेध करुन ते पुन्हा नोंदीत समाविष्ट करण्याची मागणी करणारं पत्र राहुल गांधी यांनी सभापती ओम बिरला यांना लिहीलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.