ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात मराठी भाषेच्या आडून द्वेष आणि आगपाखड दिसून आल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही महायुती सरकारनेच मिळवून दिल्याची आठवणही शिंदे यांनी यावेळी करून दिली.