BIS देशाच्या प्रवासाला योग्य दिशा देणारा प्रबळ वारसा – प्रल्हाद जोशी

BIS, अर्थात  ‘भारतीय मानक ब्युरो’, ही केवळ एक संस्था नसून, देशाच्या प्रवासाला योग्य दिशा देणारा प्रबळ वारसा आहे, असं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय मानक ब्युरोच्या ७९ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या संस्थेनं देशात दर्जेदार परिसंस्था निर्माण करण्याबरोबरच व्यवसाय सुलभता वाढवण्यात महत्वाची महत्वाची भूमिका बजावली आहे,  असं ते यावेळी म्हणाले. 

 

BIS चिन्ह, हे विविध क्षेत्रांमध्ये विश्वासाचं प्रतीक ठरलं असून, त्याने कृषी, उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासात मोलाची भर घातली आहे, असं ते म्हणाले. 

 

केंद्रीय मंत्र्यांनी या कार्यक्रमात BIS स्टॅंडर्ड पोर्टल, ‘सक्षम’ ही उत्कृष्टतेला ओळख मिळवून देणारी वार्षिक  योजना, यासारख्या विविध  उपक्रमांची सुरुवात केली. तसंच आय.आय.टी धारवाड, आय.आय.टी पलक्कड आणि एन.आयटी अरुणाचल प्रदेश यांच्याशी डिजिटल माध्यमातून सामंजस्य करार करण्यात आले.