बिहारमधे मतदारयाद्यांच्या पुनरिक्षणादरम्यान 99 पूर्णांक 11 शतांश टक्के मतदारांकडून कागदपत्रं मिळाली असून दावे, हरकती आणि कागदपत्र दाखल करण्यासाठी अद्याप सात दिवस शिल्लक आहेत, असं केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.
बूथ पातळीवरचे अधिकारी आणि स्वयंसेवकांच्या मदतीनं राबविण्यात येणारी संकलन निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असंही केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.