डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आशियाई क्रिकेट परिषदेच्या 2 स्पर्धांमधून बाहेर पडण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा निर्णय

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आशियाई क्रिकेट परिषदेच्या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या विमेन्स इमर्जिंग टीम्स एशिया कप आणि सप्टेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या पुरुषांच्या आशिया चषक स्पर्धेत भारत आता खेळणार नाही.