डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 29, 2025 1:38 PM | bharat bangladesh

printer

भारत-­बांगलादेश सीमेजवळील तीन भू-­बंदरे पूर्णपणं बंद करण्याचा निर्णय

बांगलादेशातल्या अंतरीम सरकारनं करदात्यांचा पैसा वाचवण्यासाठी आणि सरकारी तिजोरीवरील खर्चाचा ताण कमी करण्याच्या उद्देशानं भारत-­बांगलादेश सीमेजवळील तीन भू-­बंदरे पूर्णपणं बंद करण्याचा तर आणखी एका भू-­बंदरावरील कामकाज काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती  युनायटेड न्यूज ऑफ बांगलादेशनं दिली.

 

निलफामारीतील चिलाहाटी भू-­बंदर, चुआडांगा जिल्ह्यातील दौलतगंज भू-­बंदर आणि रंगामाटीतील तेंगामुख भू-­बंदर बंद करणार असून हबीगंजमधील बल्ला भू-बंदरावरील कामकाज स्थगित केलं आहे. मुख्य सल्लागार प्रा. मोहम्मद युनूस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात झालेल्या सल्लागार मंडळाच्या बैठकीत या निर्णयाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे.