November 15, 2025 5:08 PM

printer

बीड जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लंपी’ या त्वचारोगामुळे ५८ जनावरं दगावली

बीड जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लंपी’ या त्वचारोगामुळे आतापर्यंत ५८ जनावरं दगावली असून, जिल्ह्याच्या विविध भागांत ९०० जनावरांना त्याचा संसर्ग झाला आहे. याची दखल घेऊन, शासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.