संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निःपक्षपाती तपासाची मागणी घेऊन सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा तसंच वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदविला जावा तसेच तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी शिष्टमंडळानं केली.