आशियाई क्रिकेट स्पर्धेतल्या सहभागाशी कोणत्याही मुद्यावर चर्चा नाही – BCCI

आशियाई क्रिकेट स्पर्धेतल्या सहभागाशी संबंधित कोणत्याही मुद्यावर कोणत्याही पातळीवर चर्चाच झालेली नाही, असं बीसीसीआय़ अर्थात भारतीय नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं आहे. आशियाई चषक महिला आणि पुरुषांच्या स्पर्धांमधून बाहरे पडण्याचा निर्णय बीसीसीआयनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला कळवला असल्याच्या बातम्या याआधी पुढं आल्या होत्या. त्या सर्व निव्वळ तर्क आणि काल्पनिक असल्याचं सैकिया यांनी सांगितलं.