माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने MyGov अँपच्या सहकार्याने नागरिकांना सर्जनशील ‘बदलता भारत मेरा अनुभव’ या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दूरदर्शी नेतृत्वाची ११ वर्षे, अभूतपूर्व विकास आणि परिवर्तनाची वर्ष साजरी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. इंस्टाग्राम रील, यूट्यूब शॉर्ट, शॉर्ट एव्ही, ब्लॉग आणि विकसित भारत प्रश्नमंजुषा अशा पाच स्पर्धा याअंतर्गत होणार आहेत. संशोधक, व्लॉगर्स, लेखक, ब्लॉगर्स, प्रभावशाली आणि उत्साही कथाकारांसह सर्व नागरिकांना #BadaltaBharatMeraAnubhav हॅशटॅग वापरून स्पर्धंमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विजेत्यांना पाच हजार रुपयांपासून ते तीन लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत.
Site Admin | June 20, 2025 8:06 PM | Badalta Bharat Mera Anubhav campaign
नागरिकांना सर्जनशील ‘बदलता भारत मेरा अनुभव’ या मोहिमेत सहभागी होण्याचं MIB मंत्रालयाचं आमंत्रण
