आयुष्मान भारत हा आरोग्य सेवा देणारा जगातला सर्वात मोठा कार्यक्रम असून देशातल्या जवळजवळ ६२ कोटी नागरिकांनी त्याचा लाभ घेतल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं CII, अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक व्यवसाय परिषदेला संबोधित करत होते. आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी झाल्यापासून आतापर्यंत ९ कोटी ४० लाख इतकी रुग्णालय भर्ती सेवा पुरवण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
Site Admin | May 29, 2025 3:36 PM | Ayushman Bharat
‘आयुष्मान भारत’ आरोग्य सेवा देणारा जगातला सर्वात मोठा कार्यक्रम – मंत्री जे. पी. नड्डा
