December 13, 2025 8:44 PM December 13, 2025 8:44 PM

views 3

ओदिशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उन्नती हुडा आणि इशाराणी बरुआची अंतिम फेरीत धडक

ओदिशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि इशाराणी बरुआ या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारल्यानं भारताचं सुवर्णपदक निश्चित झालं आहे. आज झालेल्या उपांत्य सामन्यात उन्नती हिनं तसनीम मीर हिच्यावर १८-२१, २१-१६, २१-१६ असा विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात इशाराणीनं तन्वी हिरेमठ हिच्यावर १८-२१,...

December 13, 2025 8:37 PM December 13, 2025 8:37 PM

views 2

शेतकऱ्यांना ई पीक पाहणीसाठी आता १५ जानेवारीपर्यंत ऑफलाईन अर्ज करता येतील-चंद्रशेखर बावनकुळे

शेतकऱ्यांना ई पीक पाहणीसाठी आता १५ जानेवारीपर्यंत ऑफलाईन अर्ज करता येतील, असं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितलं. ​आमदार विक्रम पाचपुते यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. ई-पीक पाहणीसाठी तीन वेळा मुदतवाढ देऊनही अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी करू शकले नाहीत, ई...

December 13, 2025 8:34 PM December 13, 2025 8:34 PM

views 29

केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपप्रणित एनडीएचा तिरुवनंतपुरम महानगरपालिकेवर विजय

केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत १०१ पैकी ५० जागा जिंकून विजय मिळवला आहे. त्यासोबतच इतर ठिकाणीही एनडीएनं चांगली कामगिरी केली आहे. सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वातल्या लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंटला गेल...

December 13, 2025 8:27 PM December 13, 2025 8:27 PM

views 9

मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासह घरांचा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भातले अनेक निर्णय

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी शहरात सतरा ठिकाणी समूह पुनर्विकास  योजना राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली. यासह एसआरए अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ, म्हाडाच्या ओसीसीसाठीच्या अभय योजनेला एक वर्षाची मुदतवाढ तसंच एसआरए प्रकल्प तक्रार जलद निपटाऱ्या...

December 13, 2025 8:26 PM December 13, 2025 8:26 PM

views 3

राज्यातली ढासळलेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती यासह विविध मुद्दे विधीमंडळात विरोधकांकडून उपस्थित

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कृषी क्षेत्रातल्या निधीचा अपव्यय, राज्यातली ढासळलेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती, वाढती गुन्हेगारी इत्यादी मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते आज विधानसभेत बोलत होते. अतिवृष्टीचा फटका बसलेल्य...

December 13, 2025 8:14 PM December 13, 2025 8:14 PM

views 1

डोनाल्ड ट्रंप यांनी मध्यस्थी केल्यानंतरही थायलंड-कंबोडिया चकमकी सुरु

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मध्यस्थी केल्यानंतरही थायलंड आणि कंबोडिया दरम्यान चकमकी सुरु आहेत. दोन्ही देशांच्या नेत्यांमधे शस्त्रसंधीकरण्यावर सहमती झाली असल्याचं ट्रंप यांनी जाहीर केलं होतं. मात्र कोणताही शस्त्रसंधी झालेला नाही असं थायलंड सरकारने स्पष्ट केलं आहे. तर कंबोडियाने अद्याप प्रति...

December 13, 2025 8:12 PM December 13, 2025 8:12 PM

views 6

दिव्यांग अव्यंग विवाह योजनेच्या अनुदानात वाढ

दिव्यांग व्यक्तींना सामजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी दिव्यांग- अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुदानाच्या रकमेत त राज्यशासनाने वाढ केली आहे. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधिमंडळात ही माहिती दिली. अशा जोडप्यांमधे एकजण दिव्यांग असल्यास दीड लाख रुपये, तर दोन्ही जोडीदार दिव्यांग असल्...

December 13, 2025 8:14 PM December 13, 2025 8:14 PM

नक्षलवादाने कोणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते – अमित शहा

नक्षलवादाने कोणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमधे बस्तर ऑलिंपिक्सच्या समारोप सोहळ्यात आज ते बोलत होते. येत्या ३१ मार्चपर्यंत देशातू न नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार...

December 13, 2025 3:45 PM December 13, 2025 3:45 PM

views 17

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर

अमरावती इथल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेच...

December 13, 2025 3:43 PM December 13, 2025 3:43 PM

views 2

राज्यात प्रक्रिया उद्योग उभे राहण्याची गरज – मुख्यमंत्री फडणवीस

राज्यात प्रक्रिया उद्योग उभे राहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर इथं सीआयआय अन्न प्रक्रिया परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते. या परिषदेमधे विविध विषयांवर चर्चा होईल, तसंच प्रक्रिया उद्योग क्षेत्रात प्रगती करण्यासाठी धोरणं आखली जातील, असं मुख्यम...