November 27, 2025 8:20 PM November 27, 2025 8:20 PM

शेख हसीना यांना भूखंड घोटाळा प्रकरणी २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बांग्लादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना आज ढाक्याच्या एका न्यायालयाने भूखंड घोटाळा प्रकरणी दोषी ठरवून २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे. त्याच आरोपाखाली हसीना यांच्या दोन्ही मुलांना प्रत्येकी ५ वर्षांची, तर त्यांच्या २० मंत्र्यांना निरनिराळ्या कालावधीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याआ...

November 27, 2025 8:13 PM November 27, 2025 8:13 PM

views 3

इफ्फी महोत्सवात अभिनेता आमीर खान यांचा मास्टरक्लास

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बॉलिवूड अभिनेता आमीर खान यांनी आज सामाजिक परिवर्तनाचे कथाकार या विषयावर मास्टरक्लास घेतला. चित्रपटांमध्ये लेखन आणि कथाकथन तसंच, अभिजात कथा आणि कल्पनाविष्कार यावेत यासाठी लेखकांना प्राधान्य देण्याची गरज यावेळी खान यांनी व्यक्त केली. या महोत्सवात आज ...

November 27, 2025 8:04 PM November 27, 2025 8:04 PM

views 7

दिव्यांग नागरिकांबाबत अपमानजनक टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिव्यांग नागरिकांबाबत अपमानजनक टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिले. एका कार्यक्रमात एसएमए या आजारानं ग्रस्त असलेल्यांबद्दल अपमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी एसएमए क्युअर फाउंडेशन या संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुन...

November 27, 2025 7:42 PM November 27, 2025 7:42 PM

views 1

हाँगकाँगमध्ये निवासी संकुलात लागलेल्या आगीत ६५ जणांचा मृत्यू

हाँगकाँगमध्ये निवासी संकुलात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ६५वर गेला आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे. या दुर्घटनेत ७० जण जखमी झाले आहेत. तर एकंदर २७९ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती हाँगकाँगचे नेते जॉन ली यांनी दिली आहे. आग विझवायचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. ...

November 27, 2025 7:31 PM November 27, 2025 7:31 PM

views 10

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी किती दिवस चौकशी ?

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आणखी किती दिवस चौकशी करणार, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं आज मुंबई पोलिसांना विचारला. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितल्यानंतर, तिच्या मृत्यूला ५ वर्षं उलटून गेली आहेत आणि तिनं आत्महत्या केली, की तिचा खून झाला, एवढंच पोलिसांना शोधून काढायचं ...

November 27, 2025 8:25 PM November 27, 2025 8:25 PM

views 20

आधार कार्डाच्या आधारे दिलेले जन्म-मृत्यूचे दाखले रद्द करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

केवळ आधार कार्डाच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तत्काळ रद्द करा, तसंच याप्रकरणी पोलिस तक्रारी दाखल करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल प्रशासनाला दिले आहेत. यासंदर्भातलं परिपत्रक महसूल विभागानं जारी केलं.   अमरावती, सिल्लोड, अकोला, छ...

November 27, 2025 7:15 PM November 27, 2025 7:15 PM

views 7

मुंबईत हवेची गुणवत्ता बिघडण्यामागे इथियोपियातल्या ज्वालामुखीचं कारण देता येणार नाही – Bombay HC

इथियोपियातल्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे मुंबई शहरात हवेची गुणवत्ता बिघडली, असं कारण देता येणार नाही, कारण त्याआधीपासूनच मुंबईत हवेचा दर्जा खालावलेला होता, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं आज नोंदवलं. मुंबईतल्या प्रदूषणाबद्दल २०२३पासूनच्या याचिकांवर सुनावणी घ्यायची विनंती मुख्य न्यायाधीश न्य...

November 27, 2025 8:25 PM November 27, 2025 8:25 PM

views 5

येत्या २ वर्षांत एक कोटी लखपती दीदी बनवण्याचं सरकारचं ध्येय – मुख्यमंत्री

राज्यात येत्या २ वर्षांत एक कोटी लखपती दीदी बनवण्याचं ध्येय सरकारनं ठेवलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज त्यांनी लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना...

November 27, 2025 8:25 PM November 27, 2025 8:25 PM

views 9

यंदा ३५० लाख मेट्रिक टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज

यंदाच्या ऊस गाळप हंगामात ३५० लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. साखरेचा आरंभीचा शिलकी साठा ५० लाख मेट्रिक टन असून देशांतर्गत साखरेचा खप २९० लाख मेट्रिक टन आहे. तर ३५ लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल तयार करण्यासाठी वापरली जाईल. तरीसुद्धा ७५ लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज राष्ट्...

November 27, 2025 7:09 PM November 27, 2025 7:09 PM

views 3

राज्यातल्या ५ जिल्ह्यांमधली ७५ गावं, स्मार्ट आणि इंटलिजंट व्हिलेजेस म्हणून विकसित होणार

राज्यातल्या ५ जिल्ह्यांमधली ७५ गावं, स्मार्ट आणि इंटलिजंट व्हिलेजेस म्हणून राज्य सरकार विकसित करणार आहे. नागपूरमधल्या काटोल तालुक्यातली १०, अमरावतीमधल्या चांदूरबाजारमधली २३, हिंगोलीतल्या कळमनुरीतली ११, बारामतीमधली १० आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यातल्या २१ गावांचा यात समावेश आहे. यासं...