भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज पावसामुळे रद्द झाला, आणि मलिका भारताने २ विरुद्ध १ अशी जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं. ब्रिस्बेनच्या गब्बा स्टेडीयमवर आज सामना सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारताच्या नाबाद ५२ धावा झाल्या असतानाच पावसामुळे खेळ थांबला. अभिषेक शर्मा मालिकावीर ठरला.
Site Admin | November 8, 2025 8:19 PM | AUSvIND | Cricket
भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-ट्वेंटी मालिका २-१ नं जिंकली