माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या सदैव अटल या समाधीस्थळी जाऊन वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. अटल बिहारी वाजपेयींनी आपलं संपूर्ण जीवन राष्ट्रनिर्माण आणि सुशासनासाठी समर्पित केलं, असं प्रधानमंत्री मोदी आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले. वाजपेयी यांचं व्यक्तिमत्व, कार्य आणि नेतृत्व देशाच्या विकासाच्या कार्यात सदैव मार्गदर्शक राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, लोकसभा सभापती ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा, किरेन रिजिजु यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. तसंच संसद सदस्यांनी संविधान सदनात वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.