आसाममध्ये पूरस्थिती काहीशी ओसरली असली तरीही अद्याप १६ जिल्ह्यांमध्ये ५ लाख ६० हजारांहून अधिक जण पुरात अडकले आहेत. राज्यातल्या चौदाशे गावांना पुराचा फटका बसला असून सुमारे १ हजार ९०० हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचं नुकसान झालं आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं १७५ मदत छावण्या सुरू केल्या असून त्यात ४१ हजारांहून अधिक जणांनी आश्रय घेतला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. भारतीय हवामान विभागाने येत्या चोवीस तासात राज्याच्या बहुतांश भागात मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.