डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. दुबईत भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघानं या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या या आधीच्या सामन्यात सहज विजय नोंदवला आहे. हा सामना जिंकल्यास भारताला थेट अंतिम सामन्यात प्रवेश मिळेल. अंतिम सामना येत्या २८ डिसेंबरला होणार आहे. सुपर फोर गटामध्ये काल झालेल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघानं श्रीलंकेवर विजय मिळवला.