आशिया क्रिकेट करंडक स्पर्धेत काल अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करत आशिया चषकाला नवव्यांदा गवसणी घातली. राष्ट्रपती दौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यामुळे पाकिस्तानचा डाव 146 धावांमध्ये आटोपला. भारताच्या तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांच्यातील अर्धशतकी भागीदारीने भारताला दोन चेंडू शिल्लक असताना विजय मिळाला. कुलदीप यादवनं चार गडी बाद करून संपूर्ण मालिकेत सर्वाधिक सतरा बळी घेतले. तिलक वर्मा सामनावीर तर अभिषेक शर्मा मालिकावीर ठरला. भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादवनं सामन्यात मिळालेली रक्कम भारतीय सेनेला देण्याची घोषणा केली.
Site Admin | September 29, 2025 9:03 AM | AsiaCup2025 | Team India
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत नवव्यांदा अजिंक्य
