विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगाने सुरू आहे, असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केलं.
हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते. देशाच्या तंत्रज्ञानाधारित भविष्याकडे लक्ष वेधून त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान आणि उत्पादनं तयार करण्याचं आवाहन केलं. सेमीकंडक्टर क्षेत्रात सुरू असलेल्या कामाबद्दल ते म्हणाले.