डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अक्षय ऊर्जा निर्मिती संदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेनं काम करावं – उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्र आणि राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा निर्मिती संदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेनं काम करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यामध्ये शाळा, कार्यालयांच्या सौर ऊर्जेसंदर्भातल्या प्रस्तावाचा समावेश करावा, असंही त्यांनी सांगितलं. सर्व जिल्ह्यांच्या वार्षिक योजनेसंदर्भात काल मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय ई बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपस्थित लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांबाबतचे प्रस्ताव सादर केले.