डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

फलंदाज अजिंक्य रहाणे ईराणी चषक क्रिकेट स्पर्धांसाठी मुंबई संघाचा कर्णधार

ईराणी चषक क्रिकेट स्पर्धांसाठी मुंबई संघाचा कर्णधार म्हणून फलंदाज अजिंक्य रहाणे याची निवड झाली आहे. त्याच्यासह शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, मुशीर खान, शम्स मुलानी आणि तनुश कोटियन हे मुंबईच्या रणजी संघातले खेळाडूही या संघात असतील. येत्या १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.