न्यायव्यवस्थेत एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या एआय समितीची पुनर्रचना करायचा निर्णय सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी घेतला आहे.
पाच सदस्यांच्या या समितीचं नेतृत्व न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्याकडे असेल. न्यायदानाच्या प्रक्रियेची कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करता येईल, याबाबत ही समिती विचार करणार आहे.