अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं असून नुकसानाचे सरसकट पंचनामे अधिकचं मनुष्यबळ उपलब्ध करून तातडीनं करावेत. शासनाच्या स्थायी आदेशाप्रमाणे आपतीग्रस्तांना मदत मिळेलच, परंतू विशेष बाब म्हणूनही मदत आणि पुनर्वसन विभागाकडे मदतीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. या संकटप्रसंगी सरकार पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. जिल्हयात पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी विखे पाटील यांनी नगर तालुक्यातील सोनवाडे, खडकी आणि वाळकी या गावांना भेटी देऊन केली. त्यावेळी ते बोलत होते.
Site Admin | May 29, 2025 9:53 AM | Ahilyanagar | Unseasonal Rain
अहिल्यानगरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना
