अहिल्यानगर – वारकर्‍यांच्या सुविधांसाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर

अहिल्यानगर जिल्ह्यातून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांसोबतच्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने २ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे १६० स्थानिक पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात.